कोल्हापूर : शहराची हद्दवाढ होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हद्दवाढ न झाल्याने शहराच्या विकास प्रक्रियेत अनेक अडथळे येत आहेत. म्हणून माझ्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हद्दवाढीबाबत सकारात्मक आहोत. याबद्दलची प्राथमिक चर्चा झाली असून, हद्दवाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

Kolhapur News : विद्यार्थी कमी असलेल्या पदव्युत्तर केंद्रांना कुलूप; विद्यापीठाच्या विद्या परिषदेचा निर्णय

आमदार चंद्रदीप नरके यांनी हद्दवाढीसाठी कोणतीही बैठक झालेली नाही. गावांची इच्छा असल्याशिवाय त्यांना शहरात सहभागी करून घेता येणार नाही, असे विधान आज केले. याबाबत अबिटकर म्हणाले, ‘‘प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका मांडावी लागते. त्याला त्याचा अधिकार आहे. शहराची हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. गेल्या ४० वर्षांत हद्दवाढ न झाल्याने शहराच्या विकासात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळेच हद्दवाढ होणे आवश्यक आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिका प्रशासकांना हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्यात अनेक शहरांची हद्दवाढ झाली. त्यावेळी जी प्रक्रिया अवलंबवण्यात आली तीच येथे राबवण्यात येणार आहे. यामध्ये वेगळे काही नाही.’’


शहरातील वाहतूक कोंडीबद्दल ते म्हणाले, ‘‘शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी विस्तृत आराखडा बनवण्यात आला आहे. यामध्ये काही ठिकाणी एकेरी मार्ग करणे, रस्त्यांवर पट्टे रंगवणे, पार्किंगची जागा वाढवणे यासह अन्य काही उपाययोजना यामध्ये आहेत. त्यामुळे याची टप्प्या टप्प्याने अंमलबजावणी करून शहरातील वाहतूक कोंडी कमी केली जाणार आहे. शहरात पाणी साठू नये यासाठी नालेसफाई करा.’’
यावेळी आमदार शिवाजी पाटील, अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Success Story: 'अंगणवाडी सेविका ५४ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण'; गोरेवाडीच्या इंदिरा घाडगेंची जिद्द, इच्छाशक्ती प्रबळ रंकाळ्यावरील पदपथ हटवणार


रंकाळा टॉवर ते फुलेवाडी या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. याबाबत कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत, असे विचारले असता प्रशासक के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘या मार्गावरील रस्त्याशेजारी नागरिकांना चालण्यासाठी पदपथ आहे; मात्र बहुतांश पर्यटक, फिरायला येणारे रंकाळा तलाव उद्यानातून चालतात. त्यामुळे हा पदपथ काढून टाकणार आहेत. येथे पार्किंगसाठी जागा वाढवणार आहोत.’’

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.