इंदू आणि अधूचे लग्न झाल्यापासून 'इंद्रायणी' (Indrayani ) मालिकेला एक रंजक वळण आले आहे. अलिकडेच इंदू-अधूचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. मात्र, लग्नानंतर लगेचच त्यांच्या संसारामध्ये संकटांची मालिका सुरू झाली आहे. इंदू आणि अधूच्या नात्याला आनंदीबाई आणि गोपाळने मोठं आव्हान दिलं आहे.
View this post on Instagram
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)
गोपाळ आणि आनंदीबाई दोघांचंही ठाम मत आहे की, इंदू आणि अधूचा संसार सुखाचा होऊ द्यायचा नाही. त्यामुळे मालिकेत प्रत्येक दिवशी नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. 'इंद्रायणी' मालिकेत शंकुतलाला पोटाचा कॅन्सर झालेला आहे. त्यामुळे तिच्या उपचारांची जबाबदारी गोपाळ घेतो. त्यामुळे तो वाड्यात पुन्हा पाय ठेवतो. पण यामागे गोपाळचाकाही तरी वेगळा हेतू आहे. त्याला इंदू आणि अधू नात्यात फूट पाडायची आहे.
इंदू-अधूचा नव्याने सुरू झालेला संसार उध्वस्त करणे. आता मालिकेत गोपाळ कोणते नवीन डावपेच आखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नवीन संकटाला इंदूकशी मात देणार हे येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. एकीकडे इंदू तिच्या संसारासाठी झगडते आहे तर दुसरीकडे अधूवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे त्यांचं नातं अधिक घट्ट होते. इंदू आणि अधू देव दर्शनाला गेले असताना अधूवर हल्ला होतो पण त्या कठीण प्रसंगात दोघेही एकमेकांच्या साथीने यातून बाहेर पडतात.
View this post on Instagram
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)
अधूचा रुसवा दूर होतो आणि नव्याने संसार सुरू होतो. पण या नवीन सुरुवातीलाच गोपाळचं परतणं आणि त्यात आनंदीबाईंची साथ हे सर्व गोष्टी पुन्हा एकदा वादळाची चाहूल देतात. गोपाळ आपल्या प्लॅनमध्ये यशस्वी होणार का? इंदू आणि अधू हे नवं आव्हान कसं पार करतील? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'इंद्रायणी' मालिका रविवारी दुपारी 29 जून 2025 ला दुपारी. १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.
Ashi Hi Banwa Banwi : "धनंजय माने इथेच राहतात का?" डायलॉग कोणी लिहिला? सचिन पिळगांवकर यांनी सांगितला भन्नाट किस्साContact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.