Satej Patil : शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना लोकांच्या माथी मारला जात आहे. सरकारने या महामार्गाच्या भूसंपादनाला नव्याने मान्यता दिली असली तरी आमचा या विरोधातील लढा सुरूच राहील. या उलट हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी दिला.


ते म्हणाले, ‘‘कोल्हापूरमधून जाणारा महामार्ग विधानसभा निवडणुकीपूर्वी रद्द केला होता. गरज नसलेला हा रस्ता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर महामार्ग असताना या रस्त्याची गरज नाही. आता ८६ हजार कोटी खर्चून हा रस्ता करण्यापेक्षा राज्यातील रस्ते दुरुस्त करावेत, खड्डे भरावेत. सरकारने ठेकेदारांची बिले अजून दिलेली नाहीत; मग हा हट्ट कशासाठी? सांगली-कोल्हापूरला महापुराचा फटका अनेक ठिकाणी या महामार्गामुळे बसणार आहे. त्याला पर्यायी मार्ग आहेत. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाची गरज नाही.’’

Shaktipeeth Highway : बांदा परिसरात आज शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी; शेतकऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता

सरकारची दडपशाही


श्री. पाटील म्हणाले, ‘‘या रस्त्याची मोजणी अडवली म्हणून धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना अटक केली जाते. ही सरकारची दडपशाही आहे. सरकार ठेकेदारांना धार्जिणे आहे; जनतेसाठी नाही. सरकारकडे एवढीच मागणी आहे की २० हजार कोटी रुपये खड्डे भरण्यासाठी द्या. नवीन एसटी बसगाड्या द्याव्यात.’’


सत्ताधारी आमदारांचाही विरोध


पाटील यांनी दावा केला, की म्हणाले,‘‘या महामार्गाविरोधात आम्ही कोल्हापुरातून आंदोलन सुरू केले होते. आझाद मैदानावर मोर्चा नेला होता. सत्ताधारी आमदार खासगीत सांगतात की, आमचा विरोध आहे; परंतु जाहीरपणे बोलू शकत नाही.’’

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.