पारनेर : तालुक्यातील पठारभागावर पाणी आणणार, अशा आश्वासनावर तालुक्यात १० आमदार होऊन गेले. मात्र त्यांना पाणी आणता आले नाही. मात्र तालुक्यात पाणी आणण्याचा जो शब्द (कै.) बाळासाहेब विखे पाटलांनी तालुक्याला दिला होता, तो शब्द त्यांचे चिरंजीव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येत्या पाच वर्षांमध्ये पूर्ण करतील, असा शब्द मी तालुक्याच्या शेतकऱ्यांना देतो, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

Success Story: 'अंगणवाडी सेविका ५४ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण'; गोरेवाडीच्या इंदिरा घाडगेंची जिद्द, इच्छाशक्ती प्रबळ

नारायणगव्हाण येथे कुकडी कालव्याच्या अस्तारीकरणाच्या सुमारे ३२९ कोटी रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन डॉ. विखे यांच्या हस्ते व आमदार काशिनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी सभापती गणेश शेळके, प्रशांत गायकवाड, विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे, उद्योजक सुरेश पठारे, विजय औटी, लाभेश औटी, विक्रमसिंह कळमकर, वसंत चेडे, सचिन वराळ, सुनील थोरात, सागर मैड, अश्विनी थोरात, सुषमा रावडे, सोनाली सालके, बाबासाहेब खिलारी, कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, दिनेश बाबर, उपअभियंता दीपक गोडे, उपअभियंता भाग्यश्री चवणे आदी उपस्थित होते.


डॉ. विखे म्हणाले की, माझ्या पराभवामुळे तालुक्यातील कोणत्याही कार्यकर्त्याबद्दल किंवा शेतकऱ्याबद्दल द्वेषभावना माझ्या मनात नाही. गणेश शेळके यांनी उल्लेख केलेल्या तीन ते चार गावांना कालव्याचे आऊटलेट काढून त्यांचे बंधारे भरण्यासाठी तरतूद करून घेऊ, हा शब्द मी आपणास देत आहे. तसेच सुजित झावरे यांनी पिंपळनेर जवळील कालव्यावर पुलाची मागणी केली, तो पूलही तातडीने केला जाईल. माझा पराभव झाला, तरीही मी तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण केल्यशिवाय राहाणार नाही. तालुक्यातील कोणतेही काम आडणार नाही.


कुकडी कालव्याचे १२०० क्यूसेक्सने सोडलेले पाणी तालुक्याला फक्त ९०० क्यूसेक्सने मिळते तेही अवर्तनाच्या शेवटी. त्यामुळे शेतक-यांना पाणी मिळत नाही. अवर्तन सोडताना प्रथम जातानाच पाणी मिळावे, कालव्यावरील जुने पूल दुरस्त कारावेत.


- विश्वनाथ कोरडे, भाजप प्रदेश कार्ययकारिणी सदस्य

माेठी बातमी! 'विठ्ठलाच्या टोकन दर्शनाचा नऊ दिवसांतच काळाबाजार'; सहा भाविक ताब्यात; दलालांचा हात असण्याची शक्यता

तालुक्यात कुकडी कालव्याच्या अस्तारीकरणासाठी २५ वर्षांत प्रथमच सुमारे १०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. कालव्याचे पाणी टेल टू हेड, हा राज्यसरकारच निर्णय आहे. त्यात बदल करता आला, तर करावा.


- काशिनाथा दाते, आमदार

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.