राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीत मोठ्या राजकीय नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून राहुरी विधानसभा निवडणुकीत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे पुत्र अक्षय कर्डीले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मविआ सरकारच्यावेळी ते राज्यमंत्री देखील होते.

Prajakta Tanpure : तनपुरेंनी उमेदवारी अर्ज का भरला नाही? फडणवीसांचे नाव घेत सांगितलं कारण...

त्यामुळे भाजपचा पाठिंबा असूनही अक्षय कर्डीले यांना राहुरीची पोटनिवडणूक जड जाण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपने सोमवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिग्गज नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीला पोहोचले. या तिघांमध्ये बराचवेळ बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर तनपुरे यांनी माघार घेतल्याने अनेकांना मोठा धक्काच बसला.

२००० कोटींची बेहिशेबी मालमत्ता, पुण्यातील बड्या अधिकाऱ्याला हायकोर्टाचा दणका; खुली चौकशी होणार, प्रशासनात खळबळ

रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन जरी त्यांचे मन वळवले असले तरी या सगळ्या राजकीय घडामोडींमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळ दौऱ्यावर आहेत. मात्र, आज रवींद्र चव्हाण हे तनपुरे यांच्या भेटीला पोहोचले तेव्हा त्यांनी तिथून थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला.

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

या एका फोनने तनपुरे यांनी माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात प्राजक्त तनपुरे राहुरी मतदारसंघात सांगतील त्या विकासकामांसाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार 100 टक्के मदत करेल असे आश्वासन फडणवीसांनी तनपुरे यांना दिले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.