मुंबई : ममता बॅनर्जी या वाघिणीसारख्या लढत आहेत, पण भाजपवाल्यांची लढण्याची औकात नाही, म्हणून सगळीकडे ईडी आणि सीबीआय घुसवतात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. योगी आदित्यनाथ बंगालमध्ये जाऊन आझादीची भाषा करतात, पण त्यांच्या पक्षाचा आणि आझादीचा काय संबंध? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. उद्धव ठाकरे हे भारतीय कामगार सेनेच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. 


उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगालमध्ये केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले की, "योगी आदित्यनाथ म्हणतात की विवेकानंद हे बंगालचे सुपुत्र होते. ते म्हणाले, तुम मुझे खून दो, में तुम्हे आझादी दूंगा. पण तुमच्या पक्षाचा आणि आझादीचा काय संबध? तुमचा पक्ष जिंकण्यासाठी फौजा घुसवतोय. तुमची औकात नाही जिंकायची म्हणून तुम्ही इडी, CBI घुसवताय. ईडी, CBI बाजूला ठेवा आणि मग शिवसेनेसोबत सामना करा."


उद्धव ठाकरे म्हणाले की, "ममता बॅनर्जी वाघिणीसारखी लढत आहेत, त्यामुळे त्या जिंकल्याच पाहिजेत. बंगालमध्ये 2 लाख CRPF चे जवान उतरवले आहेत. तिकडे मणिपूरला 20 हजार जवान उतरवले होते. योगी आदित्यनाथ आणि आपले मुख्यमंत्री बंगालमध्ये गेले आहेत. इकडे आपल्या राज्यात महिलांचा विनयभंग होतोय, ड्रग्स प्रकरण बाहेर येताहेत, पण यांना बंगाल जिंकायचा आहे."


कुटुंब नियोजन करणे हा गुन्हा आहे का? 


महिला आरक्षणाबद्दल भाजपला एवढा कळवळा असेल तर मग संसदेच्या उद्घाटनावेळी आणि अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनावेळी महिला राष्ट्रपतींना का बोलवलं नाही? त्या आदिवासी आहेत म्हणून त्यांना बोलावलं नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली. 


उद्धव ठाकरे म्हणाले की, "हे आमचे मुख्यमंत्री म्हणतात विरोधकांचे बुरखे फाडणार. अरे आम्ही हिंदू आहोत, तुम्ही काय आमचे बुरखे फाडणार? महिला बिलाच्या आडून हे देशाची वाट लावणार होते. 2026 पर्यंत आपण लोकसंख्या कमी करण्यासाठी काही बिल आणलं आहे का? कित्येक अशी राज्यं आहेत जे परिवार नियोजन करत आहेत. कुटुंब नियोजन करणे हा गुन्हा आहे का? मोहन भागवत म्हणतात दोन पेक्षा जास्त मुलांना जन्म द्या, पण त्यांना नोकऱ्या कोण देणार?"


आमचा संबंध त्या भगव्याशी


उद्धव ठाकरे म्हणाले, "भारतीय कामगार सेनेची 58 वर्षे झाले, आपण कधीच कामगारांचा घात केला नाही. आता नवीन दुकानं उघडली जात आहेत, लोकांना  खरेदी केलं जात आहे. युनियन म्हणजे दुकानदारी झाली, चांगली चाललेली युनियन फोडायची, तोडायची आणि नंतर बोंब मारयची. 500 रुपयांसाठी आयुष्याची वाट लावून घ्यायची. सगळींकडे आपल्या युनियन्स आहेत, सगळ्या मालकांशी माझ्या ओळखी आहेत. पण माझा संबंध त्या युनियनच्या भगव्यासोबत आहे, मी एवढं परखड वागत असलो तर तुम्ही सुद्धा वागलं पाहिजे."


कामगार म्हणजे देशाचा भाग्यविधाता नाही का? आजपर्यंत जे जे लढे झाले त्या लढ्यात कामगार उतरला नसता तर आपलं स्वातंत्र दूर गेलं असतं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा तर यशस्वी झालाच नसता. पाहिजे तेव्हा कामगारांच्या बाजूने बोलायचं आणि प्रत्यक्षात वाटोळ करायचं, असं भापजकडून सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 



ही बातमी वाचा: 


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.