केंद्र सरकारने उचलले पाऊल : निर्णयाचा होणार मोठा परिणाम
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांना दूरसंचार सेवांशी संबंधित अधिकारांचा वापर करण्याची मंजुरी दिली आहे. या अधिकारात सार्वजनिक सुरक्षा किंवा राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीदरम्यान दूरसंचार सेवांवर नियंत्रण, सिग्नल इंटरसेप्शन आणि संदेशांच्या डिक्रिप्शन यासारख्या सुविधांचे व्यवस्थापन सामील आहे. आदेशानुसार राष्ट्रपतींनी उपराज्यपालांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 239 अंतर्गत केंद्रशासित प्रदेशातील सरकारच्या अधिकारांचा वापर करण्याचा निर्देश दिला आहे. हा अधिकार दूरसंचार अधिनियम, 2023 (44 ऑफ 2023)चे कलम 20(2) च्या अंतर्गत देण्यात आला आहे, जो सार्वजनिक सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित प्रकरणांमध्ये लागू होतो.
केंद्रशासित प्रदेशाच्या विविध हिस्स्यांमध्ये दहशतवादविरोधी अभियानांदरम्यान अधिकारी अभियान सुरू असताना दूरसंचार सेवा रोखत असतात. वेढले गेलेले किंवा लपलेले दहशतवादी स्वत:च्या बाहेरील क्षेत्रात असलेल्या सहकाऱ्यांसोबत संपर्क साधू नयेत आणि सुरक्षादलांच्या हालचालींची माहिती त्यांना बाहेर पाठविता येऊ नये म्हणून अशाप्रकारचे पाऊल उचलले जाते. याचबरोबर दूरसंचार सेवांवर नियंत्रण सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांना दहशतवाद्यांच्या संपर्कयंत्रणेला ट्रॅक करणे आणि त्यांचा ठावठिकाणा शोधून काढण्यास मदत करते.
निर्णयामुळे उपराज्यपालांना मिळणारे अधिकार
सरकारने का घेतला निर्णय?
काय होणार लाभ?
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.