कोल्हापुरात घडली भीषण अपघाताची घटना


भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू


चौघांच्या मृत्यूने आजरा तालुक्यात हळहळ व्यक्त केली आहे


रणजीत माजगावकर, साम टीव्ही


कोल्हापुरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुचाकी आणि टेम्पोची धडक झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. चौघांच्या जागीच मृत्यू झाल्यानंतर आजरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.


साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर भीषण अपघात झाला. महामार्गावर दुचाकी आणि टेम्पोची धडक झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. व्होन्याळी गावचे चांदे कुटुंबीय दुंडगे गावाला जात होते. मृत पावलेल्यांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

व्होन्याळी गावातील दीपक चांदे (39), शोभा चांदे (35), जय चांदे (10), पूर्वा चांदे (7) यांचा असे मृत पावलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण मुंबई वास्तव्यास होते. उन्हाळी सुट्टी साठी गावाकडे आले होते. गावाकडे नवीन घर बांधल्यानंतर पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी संपूर्ण कुटुंब मुंबईहून गावाकडे आले होते. त्यानंतर ते उद्या शुक्रवारी मुंबईला परत जाणार होते. मात्र त्याआधी पाहुण्यांना भेटण्यासाठी दुचाकीवरून दुंडगे गावाला निघाले. मात्र वाटेत टेम्पोची धडक बसल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.

Yavatmal Accident: भरधाव टिप्परनं दोघांना चिरडलं; होमगार्डची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू
शहापुरात दुचाकीस्वाराचा मृत्यू

तत्पूर्वी, मुंबई-नाशिक महामार्गावरील रेल्वे ब्रिजच्या संरक्षक कठड्याला दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वार 200 फूट खाली असलेल्या रेल्वे ट्रॅकवर पडला. या घटनेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर झालाय. या दोघांना खर्डी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. दोघे जण राजूर अकोला बाभुळवडी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.