भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज के. एस. भरतने अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची बातमी चाहत्यांना दिली. भारतासाठी सात कसोटी सामने खेळलेला भरत, अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात नाही.


एकेकाळी कसोटी क्रिकेटपटू ऋषभ पंतचा राखीव खेळाडू असलेला भरत, बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. हा ३२ वर्षीय खेळाडू भारतासाठी शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारी २०२४ मध्ये खेळला होता. त्याने सर्वप्रथम आपल्या निवृत्तीबद्दल पोस्ट करत लिहिले, "धन्यवाद बीसीसीआय. अभिमान आणि कृतज्ञतेच्या भावनेने, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझ्या निवृत्तीची घोषणा करत आहे."

IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

त्याने पुढे लिहिले, "देशासाठी खेळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण आहे. या प्रवासासाठी खूप संयम आणि चिकाटीची गरज होती, पण कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे हा एक अनमोल क्षण आहे. चार जणांच्या कुटुंबात आम्हीसर्वांनी दोन दशकांपासून एकच स्वप्न जगले आहे. माझ्या बहिणी, आई आणि वडिलांचे खूप खूप आभार, ज्यांनी मला असे वातावरण आणि पाठिंबा दिला. मी त्यांच्या प्रेम, शिस्त आणि कठोर परिश्रमाचे फळ आहे."





View this post on Instagram

A post shared by K S Bharat (@konasbharat)