Narendra Modi Speech : पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात एनडीएला सत्तेत येऊन आज 12 वर्षे पूर्ण झाली. मोदी यांच्या सत्तेला एकूण 4399 दिवस झाले आहेत. दरम्यान, एनडीए सरकारच्या या घोडदौडीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. या परिषदेत मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. काँग्रेस सत्तेत असताना विकास कसा खुंटला होता, आम्ही सत्तेत आल्यानंतर विकासाला कशी गती मिळाली, याबाबत मोदी यांनी सविस्तर सांगितले. यावेळी त्यांनी काही आकडेवारीदेखील मांडली. त्यांनी जनतेचेही आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

देश काँग्रेसच्या कुचक्रातून आझाद झालेला आहे. काँग्रेसने देशाला लाचारी, हीन भावानेत ढकलून दिलं होतं. भारतात विकास हळूहळूच होतो, असं वारंवार सांगितलं जात होतं. भारतात गतीने विकास करणे शक्यच नाही, असे काँग्रेसकडून भासवले जात होते. या हळूहळू विकासाला हिंदू ग्रोथ रेट असे नाव दिले होते. ही कार्यशैली काँग्रेसची होती, अपयश काँग्रेसचे होते, उत्तरदायीत्व काँग्रेसचे होते. परंतु कलंक मात्र देशातील हिंदू लोकसंख्येवर लावलण्यात आला.

पहिल्यांदा एनडीएची सत्ता आली तेव्हा…

काँग्रेस सत्तेत असताना सरकार नव्हते, नीती नव्हती, विचार नव्हता. अटल बिहारी यांच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच एनडीए सरकार आले. एनडीएचे सरकार पहिल्यांदा आल्यानंतर विकासात गती कशी येते, हे आपल्याला पाहयला मिळाले. परंतु दुर्दैवाने 2004 साली देश पुन्हा अस्थिरतेच्या वादळात आणि काँग्रेसच्या सत्तेत फसून गेला. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यानंतर देशाला हजारो, कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ढकलून दिले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.