मुंबई: भारतातील शेतकरीच नव्हे तर प्रत्येकजण मान्सूनची आतुरतेने वाट पाहात असतो. यंदा पाऊस कमी पडणार की काय, अशी चिंता व्यक्त केली जात असल्याने शेअर बाजार ात गुंतवणूक करणाऱ्यांच्या मनातही भीतीचे वातावरण आहे. मात्र, नव्याने आलेल्या एका अभ्यास अहवालानुसार, कमी पावसामुळे संपूर्ण शेअर बाजार कोसळेल अशी भीती बाळगण्याची गरज नाही. कमकुवत चा फटका संपूर्ण बाजाराला न बसता केवळ काही विशिष्ट क्षेत्रांमधील कंपन्यांना बसू शकतो. 'फ्रंट वेव्ह रिसर्च' या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, पावसाच्या कमतरतेमुळे काही कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो, तर काही क्षेत्रांवर याचा काडीमात्र फरक पडणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी केवळ पाहून घाबरून न जाता, ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती आणि पिकांच्या पेरणीकडे बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.



सर्वात आधी फटका कोणाला?कमी पाऊसाचा थेट आणि पहिला फटका देशातील शेतकरी बांधवांना बसतो. पाऊस वेळेवर किंवा पुरेसा झाला नाही, तर पिकांचे मोठे नुकसान होते. शेतातून उत्पादन कमी निघाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारा पैसा घटतो. जेव्हा गावातील लोकांचे उत्पन्न कमी होते, तेव्हा ते बाजारातून वस्तू खरेदी करणे कमी करतात. म्हणजेच ग्रामीण भागातील मागणी थंडावते. यामुळे ज्या कंपन्यांचा बहुतांश व्यवसाय गावांवर किंवा शेतीवर अवलंबून आहे, त्यांच्या विक्रीत मोठी घट होते. कंपन्यांची कमाई घसरली की साहजिकच त्यांच्या शेअरच्या किमतींवर दबाव येतो.



भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थानभारतात आजही कृषी क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत शेतीचा वाटा जवळपास १६ टक्के आहे, तर देशातील सुमारे ४६ टक्के लोकांना शेतीतूनच रोजगार मिळतो. भारतात वर्षभरात जितका पाऊस पडतो, त्यापैकी ७० टक्के पाऊस हा मान्सूनचा असतो. तसेच, आपल्याकडील निम्मी खरीप पिके पूर्णपणे या पावसावर अवलंबून असतात. यामुळेच मान्सून बिघडला की ग्रामीण भागाची आर्थिक घडी विस्कटते.



कोणत्या कंपन्यांवर दबाव येऊ शकतो?अहवालानुसार, कमी पावसाचा फटका बसू शकणारी मुख्य क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत:





  • शेतीची अवजारे: ट्रॅक्टर आणि शेतीची यंत्रे बनवणाऱ्या 'एम अँड एम' (M&M) आणि 'एस्कॉर्ट्स कुबोटा' सारख्या कंपन्यांची विक्री मंदावू शकते.

  • दुचाकी वाहने: ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या 'हिरो मोटोकॉर्प' आणि 'टीव्हीएस मोटर' या कंपन्यांवर दबाव येऊ शकतो.

  • रोजच्या वापराच्या वस्तू (FMCG): गावांमधून मोठी कमाई करणाऱ्या 'एचयूएल' ( HUL ), 'दाबर' आणि 'मॅरिको' यांसारख्या कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो.

  • ग्रामीण बँकिंग व कर्जसंस्था: गावांमध्ये कर्ज पुरवठा करणाऱ्या मायक्रोफायनान्स कंपन्यांना पुढील काही महिन्यांत कर्जवसुली करताना अडचणी येऊ शकतात.

कोणत्या क्षेत्रांना धोका नाही?दरम्यान, पाऊस कमी पडल्यास सर्वच क्षेत्रांचे नुकसान होईल असे नाही. सुरुवातीच्या काळात खते, बियाणे आणि शेतीची रसायने बनवणाऱ्या कंपन्यांची विक्री वाढू शकते. कारण शेतकरी पावसाच्या आशेने पेरणीची तयारी आधीच करतात. दुसरीकडे, आयटी (IT) कंपन्या, खाजगी क्षेत्रातील मोठ्या बँका, शहरांवर आधारित किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्या आणि परदेशात माल निर्यात करणाऱ्या व्यवसायांवर मान्सूनचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.



गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्लागुंतवणूकदारांनी केवळ हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबून राहून शेअर्सची खरेदी-विक्री करू नये. त्याऐवजी, आपण ज्या कंपनीत पैसे लावले आहेत तिचा किती व्यवसाय ग्रामीण भागातून येतो, देशभरात पेरणीची काय स्थिती आहे आणि कोणत्या राज्यात पाऊस कमी-जास्त आहे, या वास्तविक गोष्टींचा सखोल अभ्यास करूनच आपले आर्थिक निर्णय घ्यावेत.



(
Disclaimer - या बातमीमध्ये दिलेली माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी आणि शैक्षणिक उद्देशाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष शेअर खरेदी-विक्रीचा किंवा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमींच्या अधीन असते. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी किंवा कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या नोंदणीकृत वित्तीय सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. )

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.