Uddhav Thackeray News : शिवसेनेला काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा डाव असल्याचा आरोप बंडखोर सहा खासदारांनी केला होता. त्या आरोपाला उद्धव ठाकरेंना उत्तर दिले आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.


ते म्हणाले, '30 वर्ष भाजपसोबत राहून त्यांच्यात विलीन झालो नाही तर काँग्रेसमध्ये विलीन काय होणार.शिवसेना विलीन होण्यासाठी जन्माला आली नाही तर हिंदुत्वासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी आली आहे.'


पुढे बोलताना ते म्हणाले, 'उद्धव ठाकरे भेटत नाही. आदित्य ठाकरे फिरत नाही. मी भेटत नव्हतो तर तू निवडून कसा आला, त्यावेळी मी प्रत्येक लोकसभेत सहा ते दहा सभा घेतल्या, तेव्हा तुम्हाला निवडून आणलं.'


आज आपल्याला विरोध करतायेत तेच आहेत शिवसेनाप्रमुखांना विरोध केला. आजोबांना ज्यांनी विरोध केला गोमुत्रधारी होते. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे. शेंडी जाणव्याचे आहेत. जो भगव्यात भेसळ करतो तो हिंदू असू शकत नाही, उद्धव ठाकरे म्हणाले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.