शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 आमदार पक्षातून फुटले आहेत. या सर्व पार्श्वभूमीर शिवसेनेच्या वर्धापन दिनी आयोजित मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच बंडखोर खासदारांवर देखील त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.  यावेळी बोलताना ते चांगलेच भावुक झाले.  आज गद्दारी झाली त्या वॉर्डातील मतदारांची मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 


शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज माझ्यावर टीका होत आहे. माझ्या पत्नीवर टीका होत आहे. तेजसवर टीका होत आहे. भाजपने दगा दिला म्हणून मी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. मातोश्रीने फक्त सोसायचं. तुम्ही मंत्री व्हायचं, खासदार व्हायचं, तुमच्या मुलाने आमदार व्हायचं, पण मातोश्रीने काहीच करायचं नाही. नकोय आम्हाला? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.


दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज गद्दारी झाली त्या वॉर्डातील मी मतदारांची माफी मागतो. मोदींची लाट असताना माझ्यावर विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं, हे आम्हाला डिवचलं जात होतं. मोदींच्या चेहऱ्यावर खासदार निवडून आले म्हणत होते. मोदींचा चेहरा न वापरता आपले ९ खासदार निवडून आले. आज परत फोडाफोडी, कशासाठी फोडताय? काय मिळवायचं आहे. सत्तापिपासू किती व्हायचं, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.


उद्या समजा शिवसेना निवडणुकाच लढणार नाही. मग काय करतील? तुम्ही राहणार का माझ्यासोबत? मरमर मेहनत तुम्ही करायची, यांचे खोक्यावर खोके. शेतकऱ्यांना हमीभाव नाही, पण खासदारांचे हमी भाव ठरले. त्यांनी कर्जमाफी दिली ती फसवी आहे. शेतकरी म्हणत असतील मेलो तरी चालेल, पण कर्जमाफी नको. निवडणुकी आधी लाडकी बहीण, आता ८० लाख बहिणींचे पैसे काढून घेतले, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.