राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, नऊ पैकी सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान ज्या खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश आहे, परंतु त्यांनी शनिवारी मोठं विधान केलं होतं, मी अजूनही पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, मी माझ्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि त्यानंतरच निर्णय घेईल असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं होतं, परंतु आता ओमराजे निंबाळकर यांची अधिकृत भूमिका समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले ओमराजे निंबाळकर
आज मी धाराशिव मतदारसंघातील जीवाभावाच्या सर्व लोकांना विनंती केली होती की तुम्ही आज उपस्थित राहा. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकसभा कार्यक्षेत्रातील जीवाभावाची माणसं उपस्थित होती. सव्वाचार पासून सर्व हजर होती. आता ८ वाजत आले. सर्वांशी चर्चा केली. सर्वांचं मत जाणून घेतलं. सर्व मते जाणून घेतल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवाभावाच्या माणसांच्या सूचना आहेत. थोडी पार्शवभूमी सांगतो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्ते लढत असताना, धाराशिवमध्ये एकाही पंचायत समितीत, नगरपालिकेत आपल्याला यश मिळाले नाही.
सामान्य कार्यकर्ते चांगलं काम करणारे कार्यकर्ते वाईट पद्धतीने पराभूत झाले. मी असेन, सर्व सहकारी असेल २४ तास आम्ही सामान्य लोकांसाठी दिला. प्रामाणिक काम केलं. याचे साक्षीदार सर्वसामान्य माणसं आहेत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी, आमचा कार्यकर्ता कधी कामात कमी पडला नाही. समस्या सोडवण्यात कमी पडलो नाही. सत्तेमुळे आम्हाला यश मिळालं नाही. पराभवाला सामोरे जावं लागलं. सामान्य माणसाच्या कामासाठी आम्ही बसलो आहोत. सामान्य माणसाच्या ट्रान्सफार्मरलाही अडचणी येत होत्या. सर्वांच्या माध्यमातून निर्णय घेतला की आता शिवसेना पक्षात जाणार आहोत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार आहोत, अशी भूमिका यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर केली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.