आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं गणित जर तर वर आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरीत जागा मिळवायची असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 138 धावांचं आव्हान ठेवलं. पण हे आव्हान आणखी कमी असू शकलं असतं. सुमार क्षेत्ररक्षणामुळे हे आव्हान वाढलं असंच म्हणावं लागेल. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध केलेल्या चुकांचा पाढा पुन्हा एकदा या सामन्यात भारतीय खेळाडूंनी वाचला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने फक्त 10 चेंडूत 4 झेल सोडले. इतकंच काय तर तीन झेल फक्त 4 चेंडूत सोडले. भारतीय खेळाडूंनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणाचं सर्वात सुमार प्रदर्शन केलं. या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 10 झेल सोडले. यात बांगलादेशविरुद्ध 4, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 3, पाकिस्तानविरुद्ध 2 आणि नेदरलँडविरुद्ध 1 झेल सोडला.
टीम इंडियाच्या खेळाडूंना झेल मिळेना!दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना भारताने गमावला. या सामन्यातही भारतीय संघाने तीन झेल सोडले होते. त्यामुळे भारतीय संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मारिजाने कापचे तीन झेल सोडले. पहिला झेल दहाव्या षटकात नंदिनी शर्माने, दुसरा झेल 13व्या षटकात श्री चरणीच्या गोलंदाजीवर राधा यादवने आणि तिसरा झेल 17 व्या षटकात पुन्हा एकदा राधा यादवने सोडला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.