पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळ्यात पूर, अतिवृष्टी, वादळी वारा, विजा यांचा जसा धोका असतो, तसाच आणखी एक मोठा धोका असतो तो म्हणजे सर्पदंशाचा. कारण या काळात सापांच्या बिळात पाणी गेल्यामुळे किंवा जिथे त्यांचं पूर्वीचं आश्रयस्थान होतं, तो भाग पाण्यात गेल्यामुळे साप तिथून बाहेर पडतात. पाण्यामुळे आधीच साप घाबरलेले असतात, अशा स्थितीमध्ये जर तुमचा आणि त्यांचा संर्पक झालाच तर ते तुमच्यावर हल्ला करण्याची देखील शक्यता असते. पावसाळ्याच्या काळात साप अनेकदा बिळातून बाहेर पडून रस्त्यावर येतात. साप पावसाच्या दिवसांमध्ये नेहमी कोरड्या आणि सुरक्षित जागेचा शोध घेत असतात, अशावेळी ते तुमच्या घरात घुसण्याचा धोका देखील वाढतो. तसेच ते तुमच्या कॉलनीमध्ये देखील येऊ शकतात.


जर समजा तुम्हाला तुमच्या घरात किंवा कुठेही कॉलनीमध्ये साप आढळून आला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करून  नका त्याची माहिती तुमच्या परिसरातील सर्पमित्रांना द्या, ते सापांना त्यांच्या सुरक्षित आधिवासात सोडतील. यामुळे सापांचा देखील जीव वाचेल आणि तुमचाही बचाव होईल. परंतु तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? निसर्गात अशी काही झाडं असतात, जी सापांना स्वत:कडे आकर्षित करतात. या झाडांच्या विशिष्ट गुणधर्मामुळे साप या झाडांकडे आकर्षित होतो.


असंच एक झाड आहे, ते म्हणजे चंदनाचं. या झाडाच्या आसपास अनेकदा साप दिसून येतात. या झाडाची रचनाच अशी असते की साप या झाडाकडे आकर्षित होतात. याचं मुख्य कारण म्हणजे चंदनाच्या झाडाला जी फळं लागतात, ती फळं पक्ष्यांचं आवडतं खाद्य असतं, त्यामुळे पक्षी अनेकदा चंदनाच्या झाडावरच आपलं घरटं देखील तयार करतात. पक्षी आणि पक्ष्यांची अंडी हे सापाचं खाद्य असल्यामुळे साप नेहमी या झाडाच्या आसपासच राहतात. संधी मिळताच ते पक्ष्यांची शिकार करतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चंदनाची सावली गार असल्यामुळे देखील साप अनेकदा या झाडाभोवती वास्तव्य करतात. त्यामुळे शक्यतो चंदनाचं झाडं हे घरापासून थोड दूर किंवा शेतात लावावं.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.