गुवाहाटी: आसाममध्ये काँग्रेसने अखिल गोगोईंच्या नेतृत्वाखालील राइजर पक्षासोबतची राजकीय आघाडी औपचारिक स्वरुपात समाप्त केली आहे. काँग्रेसने प्रादेशिक पक्षावर आघाडीचे मापदंड अन् राजकीय मर्यादांचे वारंवार उल्लंघन करण्याचा आरोप केला आहे. आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई यांच्या निर्देशावर हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या एकजुटतेच्या उद्देशाने काँग्रेसने डावे अन् प्रादेशिक पक्षांना एकत्र आणत आघाडी केली होती. याचा उद्देश भाजप विरोधात संयुक्त विरोधी पक्ष उभा करणे होता. राइजर पक्ष देखील या आघाडीत सामील होता. आघाडीत असूनही राइजर पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने काँग्रेस विरोधात दुष्प्रचार केला आणि पक्षाच्या नेत्यांवर वैयक्तिक टिप्पणी करण्यात आल्या.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.