वाशिम येथे नुकसानीची पाहणी केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली असता, शेतकऱ्यांनी त्यांना कमीत कमी हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत सरकारकडून तातडीने मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय, शेतमजूर वर्गाने पीक नसल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांना कुटुंबासाठी 25 हजार रुपयांची मदत दिली जावी, अशी मागणी पवारांनी केली.
चारा छावण्या लवकरात लवकर सुरू करण्याची गरजही पवारांनी अधोरेखित केली. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहीर केलेली कर्जमाफी तातडीने लागू होणे आवश्यक आहे. अनेक शेतकरी कुटुंबातील मुले नागपूर, पुणे किंवा इतर शहरांमध्ये शिक्षणासाठी जातात. त्यांची फी भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे सध्या पैसे नाहीत. त्यामुळे सरकारने या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचाही विचार करावा, अशा विविध मागण्या रोहित पवारांनी सरकारकडे केल्या आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.